
अबब, गजब जाहले, वारी चांगलीच शेकली,
वारकऱ्याने वीटच चक्क विठ्ठलावर फेकली,
चोरीची जर शैली, चोरीचेच नाही का विचार?
वारकऱ्याच्या दिशाहिनतेला विठ्ठलच जबाबदार
दावितो साऱ्या जगा, विठ्ठलाचे पाय मातीचे,
एका निर्णयाची काशी, धिंडवडे पुरते कीर्तीचे,
गडबड उडाली बडव्यांची, झाली दाणादाण,
संभ्रमात जनता सारी, कुणाचे होतेय 'कल्याण',
चार भिंतीतला 'छत्रपती', कलंक नेमका कुणाला,
घरगुती भांडण चिरकुट, वेठीस धरती अखिल जनाला,
वरवंट्यांची सेना यांची, तरी टमरेलांची धास्ती?
एकमेकांना करी नागवे उणीदुणी काढायची मस्ती,
एक मात्र खरे, सारे एका माळेचे मणी,
काय vision आहे यांची, विचारलेय का कधी कुणी?
यांव करू नि त्यांव करू, एकदा सत्ता आल्यावर,
बोलायला त्यांचं काय जातंय, चार लोकांत आल्यावर,
विठ्ठलाला हेच दिवस होते आता बघायचे राहिले....
आपण तरी करमणुकीशिवाय काय त्यांत अजून पाहिले?
- वैभव गायकवाड















1 comments:
nicely written... good, keep it up
Post a Comment