
कवितेत काय कठीण करायचं असतं?
ट ला ट, आणि प ला प तर जोडायचं असतं.
भावनेला गद्य-पद्याचं थोडीच सोयरसुतक असतं?
Message पोचवायचं काम तर शब्दांचंच असतं
म्हणून तर, कविता लिहिणं तसं सोपंच असतं.
विषयांच्या पुरवठ्याला जगात काय कपात आहे?
शब्दांच्या पर्यायांना 'मायमराठी झिंदाबाद' आहे,
नशिबाने यमकांची देखील इथे पुष्कळ आबाद आहे,
मांडणी pre-planned असली कि मग सगळं तयारच असतं,
म्हणून तर, कविता लिहिणं तसं सोपंच असतं.
शब्द-शब्द जोडत मग कविता होत जातात,
शब्दाचे खेळ करत स्वतःच form होत जातात,
त्यामागचे विचार सूर्यप्रकाशाइतके लख्ख होत जातात,
वाचणारे देखील शहाणे मिळाले, कि बाकी सगळं बरंच असतं,
म्हणून तर, कविता लिहिणं तसं सोपंच असतं.
Judge करणारा भले म्हणो त्याला विषयाची कुतरड,
विचारांची उधळण म्हणो वा शब्दांची उतरंड ,
उपदेशाचा पाठ म्हणो वा अगदी संदेशांची धुळवड,
आपल्याला काय, आपण आपलं काम केलेलं असतं,
म्हणून तर, कविता लिहिणं तसं सोपंच असतं.
- वैभव गायकवाड















0 comments:
Post a Comment